कामाची वेळ

सोमवार ते शनिवार | सकाळी 10:50 ते संध्याकाळी 06:00 (शनिवार(२ व ४ ) दर रविवारी शाखा बंद राहतात)

फोन नंबर

+९१ ९३५६ ४७० ७१२

ई-मेल

it.dept@samruddhingps.com

3

शाखा

25000

खातेदार

22000

ठेवीदार

4000

कर्जदार

समृद्धी नागरी व ग्रामिण सहकारी पतसंस्था मर्या.वाशिम


संस्थेविषयी

“NECESSITY IS THE MOTHER OF INVENTION” अर्थात ‘गरज ही शोधाची जननी आहे’.

आपल्या समृद्धी पत संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांना तसेच संस्थेच्या आधारस्तंभांना मी संस्थेच्या जन्माची कहाणी अगदी थोडक्यात सांगू इच्छितो.

मी आणि प्रा.डॉ.शिवदास कतोरे(M.sc, Phd. Maths)R.A कॉलेज ला होते.सध्या विध्यापिठातून सेवानिवृत्त झालेले आहेत.आम्ही दोघे आकोली जहा. ता. अकोट जि.अकोला येथील मुळचे. दररोज संध्याकाळी फिरत असताना विषय असायचा काहीतरी भरीव कार्य करावे. अनेक विकल्प समोर आले जसे की, शाळा,D.Ed, B.Ed, पतसंस्था इत्यादी परंतु त्यामधून आम्ही शेतकर्यांना आणि आपल्या सारख्या गरजू कर्मचारी बंधूंना प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करता यावी यासाठी पत संस्था सुरु करण्याचे ठरविले. त्यामध्ये प्रा.दाटके, प्रा.मिटकरी, श्री.विलास पाटील, श्री.सदाशिवराव जाधव इत्यादींनी आम्हाला अनुमोदन दिले. प्रत्यक्ष कामची सुरुवात करण्यासाठी त्यावेळचे मेडशी मतदार संघाचे आदरणीय आमदार स्व.सुभाषराव रामरावजी झनक यांनी आम्हाला मंत्रालयातून पत संस्था उघडण्याची सुरु करण्याची विशेष परवानगी आणून दिली. आणि रु.१,१६,०००/- चे भाग भांडवल उभे करून दि. ९ मे १९९५ रोजी आदरणीय स्वातंत्र सैनिक,शिक्षण महर्षी आणि संपूर्ण वाशिम करांचे काकाजी स्व.श्री.मदनलालजी बाकलीवाल यांचे शुभ हस्ते व मा.आमदार स्व. श्री सुभाषरावजी झनक यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयला प्रत्यक्ष सुरुवात झाली.सुरुवातीला २००२-०३ पर्यत प्रा.दाटके हे अध्यक्ष होते.सन २००३-०४ च्या निवडणुकीनंतर मी स्वत: अध्यक्ष म्हणून निवडला गेलो तेव्हा संस्थेच्या ताळेबंधाची बेरीज फक्त रु. ६६ लाख एवढी होती आणि आता २०२४-२५ मध्ये जवळपास २१ वर्षात ही बेरीज रु.६६ कोटी वर गेली म्हणजे संस्था १०० पट वाढली आणि कळंबा व शहर शाखा अशा दोन नवीन शाखा उघडल्या गेल्यात. संस्था तालुका कार्य क्षेत्रातून वाशिम जिल्हा कार्यक्षेत्रात अग्रेसर झाली.

Image

वाशिम जिल्हा परिसरातील वाशिमसह, कळंबा महाली, सुपखेल, काजलांबा, खरोळा, साखरा, कानडी, नागठान, बिटोडा, पार्डीआसरा, जांभरून भिते, खंडाळा, आडोळी, जांभरून जहागीर, बाभूळगाव, दगड उमारा, फाळेगाव, शिरपुटी, कृष्णा, ब्रम्हा, देपूळ, शेलू बुजरूक, पिंपळगाव, अनसिंग, वारा जहागीर, दिल्ली जयपूर,कार्ली, तोरणाळा, काटा, मैराळडोह, वाळकी जहागीर, वाळकी मंजरे, हिवरा गणपती, सावरगाव, मोहजा वांगी, मुठा इत्यादी खेडे गावातील शेतकर्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करून त्यांना सावकारीतून मुक्त केलेले आहे.

संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असुन वाशिम जिल्हातील अनेक चांगल्या संस्थांनमध्ये समृद्धी पत संस्थेची गणणा केली जाते.

या सर्व प्रकियेत मला समृद्धी परिवारातील सर्वांची मोलाची साथ मिळते हे निश्चित आणि त्याबद्दल मी सर्वाचे मनापासून आभार मानतो.

संस्थेचा सर्व व्यवहार हा पारदर्शी असुन २००४-०५ पासून संस्था सतत नफ्यात असुन लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ मध्ये आहे.

संस्थेचे कामकाज आपण सर्वजण मिळून असेच चालू ठेऊन संस्थेची व आपली भरभराट करू या आणि संस्थेला ‘शाश्वत’ संस्था बनवू या.